विधवा महिलेला न्याय मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
अहमदनगर – बाभूळगाव राहुरी येथील मनीषा गोरख पाटोळे या विधवा महिलेला सासरच्या नातेवाइकांकडून मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे समवेत मनीषा पाटोळे, आशाबाई मिसाळ, कचरू मिसाळ, हर्ष पाटोळे, सार्थक पाटोळे, सुशांत महस्के, पवन भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.