
पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेतल्या. रजनी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यासंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सह पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांना महिलेने गळफास घेतल्याची माहिती कॉलवर मिळाली होती.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पंचनामा आणि चौकशी करत होते. या प्रकरणासंदर्भात नेहरूनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.