
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- एप्रिल तालुक्यातील कुकडी पाणी प्रश्न,वीज, भूसंपादित जमिनीचा मोबदला यासह आदी मागण्यांसाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दि.४ एप्रिल पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तहसीलदार मिलिंद कुलथे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे साहेब, महावितरणचे चौगुले साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर काल रात्री राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण मागे घेतले.