DNA मराठी

राज ठाकरे ‘त्या’ भूमिकेवर ठाम; गृहमंत्र्यांनी दिला इशारा म्हणाले, आम्हीदेखील पूर्ण तयारीत..

0 207
MNS's big reaction after all-party meeting: Ultimate on May 3; Now ..
 
मुंबई –  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या इशारा नंतर आता राज्यसरकार देखील भोंग्या बाबत कठोर धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पूर्ण तयारीत असल्याचं स्पष्टच सांगितलं आहे.

“कोणताही निर्णय घेताना दोन्ही बाजूचे परिणाम पहावे लागतात, त्यानंतर राज्य सरकारची भूमिका ठरवावी लागते. एकदा पोलीस महासंचालक, आयुक्तांच्या स्तरावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलू आणि नंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Related Posts
1 of 2,482

“परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. “कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल,” असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला.

“सगळ्या देशात एकाप्रकारे काही घटक अशांतता वातावरण निर्माण करत असून महाराष्ट्रातही प्रयत्न सुरु आहेत. पण महराष्ट्र पोलीस पूर्ण तयार आहेत. अशांततेतेच वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. दंगलीचा कट असल्याची काही माहिती नाही. पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. आम्ही त्यानंतर मुख्यमंत्री तसंच सर्व गुप्तचर यंत्रणांशी बोलू आणि परिस्थिती हाताळण्यासंबंधी निर्णय घेऊ,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. “पोलीस महासंचालक, आयुक्तांची बैठक होणार असून त्यानंतर रिपोर्ट येईल. त्यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,” असंही ते म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: