DNA मराठी

आमदार रवी राणांची मोठी घोषणा; ‘तो’ आंदोलन घेतला मागे; म्हणाले,पंतप्रधान मोदी..

0 328
..Then go to ‘Matoshri’ and read Hanuman Chalisa; Ravi Rana gave a warning to the Chief Minister
 मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) निवासस्थानी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana)यांनी दिला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच शिवसैनिक आणि राणा दांपत्य दरम्यान वाद निर्माण झाला होता मात्र आता आमदार रवी राणा यांनी मोठी घोषणा करत हा आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. 
 
आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. रवी राणा म्हणाले कि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये आणि कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे.
Related Posts
1 of 2,482

रवी राणा म्हणाले की, आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही स्वताहून हे आंदोलन मागे घेत आहोत. बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असं राणा म्हणाले. भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.

रवी राणा यावेळी म्हणाले की, आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठे होती. पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं. आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले. आमच्या घरात शिवसैनिक घुसले, पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत, असंही राणा म्हणाले.

राणा म्हणाले की, महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेनं निघाली आहे. पंतप्रधान विकासाचा संकल्प घेऊन महाराष्ट्रात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतंय की कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी, पंतप्रधानांचा दौरा रद्द व्हावा. हनुमान चालिसाचा एवढा विरोध का आहे? या महाराष्ट्राची व्यवस्था बिघडवण्याचं काम हे लोकं करत आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये आणि पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: