पुणे – मागच्या काही दिवसांपासुन राज्यात हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) राजकारण सुरु आहे. शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली. हे दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं.
”बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात देखील जाहीर मतभेद होते”
मी इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातही जाहीर मतभेद होते. आम्ही एकमेकांविरुद्ध शब्द वापरताना कधीही काटकसर केली नाही. मात्र बैठक संपल्यांतरबैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेकदा औरंगाबादला सभा झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. सभा संपल्यानंतर आमची संध्याकाळ ज्येष्ठ नेते बापू काळदाते आणि अनिल भालेराव यांच्यासोबत जायची. तेव्हा आपण सभेत काय बोललो, याचे स्मरणही होत नसे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.