
तर राज्यात शाळा कधी सुरु होणार या प्रश्नावर अजित पवार म्हणाले शाळा सुरू करण्या बाबत सध्या दोन मतप्रवाह पाहण्यास मिळत आहे. त्यामध्ये काही जण म्हणतात दिवाळीनंतर, तर दुसर्या बाजूला काही जण म्हणतात जिथे शून्य टक्के रुग्ण संख्या आहे.तिथे शाळा सुरू करण्यात याव्यात. तसेच राज्यातील शाळा केव्हा सुरू करायच्या. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे अंतिम निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय
१२ आमदारांनी नियुक्ती आणि राजू शेट्टी यांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी, राज्यपालांना आम्ही मागील आठवड्यात भेटणार होतो. मात्र काही कामानिमित्त राज्यपाल दिल्ली येथे गेले होते. काल आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांना आम्ही माहिती दिली आणि योग्य तो निर्णय घेतो असे त्यावर त्यांनी सांगितलं, असं उत्तर दिलं.
हे पण पहा – अतिवृष्टीमुळे शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील नुकसान. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली पाहणी