DNA मराठी

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी सिनेस्टाइल पकडला

0 401
Shocking! A mentally ill man stabbed his wife to death

 श्रीगोंदा ;-  श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विलास विठ्ठल वाकुंज (वय 54 वर्षे ) यांनी तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या सोबत सन 2021-2022 या आर्थिक वर्षांच्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतुकीचा करार केला होता वाहतूक कराराच्या पोटी टोळी मुकादम यांच्यासोबत करार करुण लेबर पुरविण्याचे मान्य केले मात्र त्यांनी त्यावर आपला शब्द पलटवला ऊस तोडणी करण्यासाठी कोणीही आले नाही त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरून तपासाची चक्रे फिरल्यावर पोलिसांनी भोकरदन या याठिकाणी जाऊन सिनेस्टाइल ने पकडले आहे.

 श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विलास विठ्ठल वाकुंज शेती करून उपजीविका भागवितो . यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद लिहून दिली की सन 2021-2022 या आर्थिक वर्षांच्या नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करण्यासाठी  ट्रक्टर नं.एम एच 16 बी एम 3673 हा कारखाण्यासोबत ऊस तोडणी कामगार व ऊस वहातुकी करण्याबाबतचा करार केलेला होता.  त्या कराराचे पोटी टोळी मुकादम कडुबा रतन साळवे  व त्याचे वडील रतन उत्तम साळवे (दोघे रा . पिंपळगाव सुतार ता . भोकरदन जि.जालना) दिनांक ३० जुले २१  रोजी 12/30  च्या दरम्यान टाकळी कडेवळीत ए डी सी सी बँक समोर ऊसतोड कामगार ( बैलगाडी सेंटर ) व लेबर इत्यादी पुरविण्याचे मान्य केले त्या कराराचे अनुषंगाने मी त्यांना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बक शाखा टाकळी कडेवडीत ता श्रीगोंदा या बंकेच्या आर टी जी एस ( तात्काळ पैसे पाठविणे ) या माध्यमातून एकुण 6,60,000 / -रुपये , 1,40,000 रोख रुपये असे एकुण८ लाख रुपये टोळी मुकादम यांना दिले होते व ठरलेल्या मुदतीत ऊसतोडणी कामगार व बैलगाडी सेंटर पुरविण्याचे ठरले होते.
 परंतू दिनांक ३० जुळे २१  रोजी आजपर्यंत अनेक महिने उलटूनही या  इसमांनी कराराप्रमाणे कोणतेही काम केलेले नाही तसेच त्यांचेशी फोन वर संपर्क केला असता आम्ही कामावर येणार नाही तुला काय करायचे ते कर अशी धमकी देवून तुला जिव मारुण टाकु व शिवीगाळ केली आहे व त्यांनी फिर्यादीची ८ लाख  रूपयांची फसवणूक केली आहे .याप्रकरणी  विलास विठ्ठल वाकुंज यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवि ४२० नुसार गुन्हा दाखल केला त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी गेले असता पोलीस आपल्याकडे येत आहेत हे पाहून आरोपीनी पळून जाण्याचा प्रयत्न केला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सूर्यवंशी यांनी शिताफीतीने सिनेस्टाइल पाठलाग करवून  मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीला जेरबंद केले आहे आज दि २५ रोजी न्यायालयाच्या समोर उभे केले असता दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Related Posts
1 of 2,489
साखर कारखानदारांनी वाहन मालकांना अभय देण्याची गरज – विलास वाळुंज 
ऊस वाहतूक करण्यासाठी साखर कारखाने वाहन मालकाशी करार करतात त्या कराराच्या आधारे लाखो रुपयाची उचल टोळी मुकादमाना वाहन मालक देतात पण अनेकदा टोळी मुकादम यांचेकडून वाहन मालकांची फसवणूक करतात मग वाहन मालकाला एकतर शेती विकावी लागते नाहीतर वाहन विकावे लागते आणि साखर कारखान्याची उचल भरावी लागते त्यामुळे वाहन मालकांना साखर कारखान्यांनी अभय देण्याची खरी गरज निर्माण झाली आहे असे वाहन मालक विलास वाळुंज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: