शहरात उद्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम; पोलिसांचा फौजफाटा तैनात

उद्या राबवण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून यात मोठ्या व्यवसायिकांना अभय आणि छोट्या व्यवसायिकांवर अन्याय होत असल्याची भावना अनेक छोट्या टपरीधारक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे शहरात अनेक मोठ्या व्यावसायिकांची काही राजकीय नेत्यांची अतिक्रमणे आहेत आधी ती अतिक्रमणें नगरपरिषदेने काढावीत असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे तर अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत हटवली जाणारच असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
टपरीधारक व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
दरम्यान ज्या टपरीधारक व्यवसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे त्या व्यवसायिकांना पालिकेने व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तर अतिक्रमण हटवल्यामुळे शहराचा श्वास मोकळा होणार असून वाहतुकीस होणारा अडथळा दूर होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.