सतत पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झाली ,भाजपचा टोला !

राजकीय वर्तुळात सध्या अनेक गोष्टींवरून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत . त्यातच आता कोरोनाकाळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत . याच कारणावरून शिवसेना खासदार संजय राऊत सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे .कोरोना काळात निवडणूक होणार म्हणून राऊत म्हणाले की तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसं जाहीर करा.
यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला देत म्हटले आहे की “सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे.
भातखळरांनी यावेळी आठवण करून दिली की मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका करोनाच्या काळातच झाल्या होत्या .भातखळकर यांनी ट्विटरवरून राऊतांवर निशाणा साधला आहे.