विसर्जनाची जागा बदलली पण भावना नाही’, सुबोध भावे


मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात गणरायाचं आगमन झालं आहे. कोरोनाची कितीही सावट असलं तरी गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह काही कमी झालेला नाही. उत्सव अतिशय साधेपणाने पण त्याच उत्साहात साजरा होताना दिसत आहे.
कोरोनाचं संकट असताना गणरायाचं आगमन अतिशय शांततेत आगमन झालं. दीड दिवसांच्या बाप्पाने आदरातिथ्यानंतर भक्तांचा निरोप देखील घेतलं आहे. यंदा प्रशासनाने बाप्पाचं विसर्जन हे घराच्या घरी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. आपल्या घरी किंवा राहत्या इमारतीच्या गच्चीवर बाप्पाचं विसर्जन करा आणि गर्दी टाळा, असं आवाहन केलं होतं.