दिल्ली – सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेप चिंता जनक शरद पवार यांचे मोदींना पत्र.


दिल्ली – देशातील ग्रामिण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेलया, सहकारी बँका वाचविण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या पत्राची गांभीर्याने दाखल घेतली असल्याचे समजते, देशात सहकारी बँकांनी साक्षरता वाढवण्याची महत्त्वाची भूमिकाही साकारली असल्याचं शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र सहकारी बँकांनावर आजही शरद पवार यांनाचेच वर्चस्व आहे, एकहाती नसले तरी त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या सहमती शिवाय बँकेची समीकरणे आजही बनतात, नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात शरद पवार यांनी सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
“सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील असेही ते पत्रात म्हणतात,”