छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आपल्या सरकारला घरचा आहेर

मुंबई – केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोना काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. असा ट्विट करून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ते म्हणले कि केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने जे कांदा नियात बद्दल सरकारला निवेदन दिले आहे त्या मुळे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला धक्का बसला आहे.दरम्यान केंद्रच्या हे निर्णय घेतल्याने कांद्याच्या दारात प्रतिक्विंटल मागे ५०० रुपयाची घसरण होणार आहे या मुळे शेतकरी या निर्णयाचा विरोध करत आहे.

केंद्रच्या हा निर्णय कांद्याच्या दारांत वाढीची शक्यता असल्याने हे निर्णय घेतला आहे. मागणीच्या तुलनेत बाजार समितीच्या आवक कमी होत असल्याने मागच्या आठवड्या पासून परत कांदयाचा दरात वाढ होण्यास सुरवात झाली होती. या वेळी ४० टक्के कांदा हे पावसामुळे खराब झाला आहे.